Marathi kavita – आई तू गेल्यावरच

4
5557

Marathi kavita – आई तू गेल्यावरच

Marathi-Kavita-Aai

आई तू गेल्यावरच का गं हे सगळं व्हावं,
आत्ता बालपणीच्या मनाला बहर यावा
-नि त्यावेळचं क्रोधी मन खाक व्हावं.

आई का गं माझ्या उदासवृत्तीतच उमटूनि दिसती ठसे,
सांग तुझ्या हृदयरुपी मनात गं कित्ती मने ?

सांग आता आई तुजविना कसे वाटेल गं मला हायसे,
मग तुजविना या जीवावर उदार का व्हायचे ?

आई कधीच न लागणार मजला संसाराची भूक,
असून गं नसल्यापरी चरणात माझे मन मूक .

त्यावेळचं माझं मलाच गोंजरणारं मन का गं दूर जावं ?
मग तू नसल्यापरी या जीवाची घालमेल का गं व्हावी .

आई हृदयात दगदग फार मनाची,तुझ्याकडे धाव घ्यायची
मग ती सानुली असो वा छकुला तिच्या आईकडेच सोडून द्यायची .

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here