Marathi kavita – आई तू गेल्यावरच
आई तू गेल्यावरच का गं हे सगळं व्हावं,
आत्ता बालपणीच्या मनाला बहर यावा
-नि त्यावेळचं क्रोधी मन खाक व्हावं.
आई का गं माझ्या उदासवृत्तीतच उमटूनि दिसती ठसे,
सांग तुझ्या हृदयरुपी मनात गं कित्ती मने ?
सांग आता आई तुजविना कसे वाटेल गं मला हायसे,
मग तुजविना या जीवावर उदार का व्हायचे ?
आई कधीच न लागणार मजला संसाराची भूक,
असून गं नसल्यापरी चरणात माझे मन मूक .
त्यावेळचं माझं मलाच गोंजरणारं मन का गं दूर जावं ?
मग तू नसल्यापरी या जीवाची घालमेल का गं व्हावी .
आई हृदयात दगदग फार मनाची,तुझ्याकडे धाव घ्यायची
मग ती सानुली असो वा छकुला तिच्या आईकडेच सोडून द्यायची .
Nice…!!!
thanks
sundar
dhanyawad